वट सावित्री म्हणजे काय?
वटसावित्री ही यमाच्या मागे जाऊन पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची आठवण. उत्तर भारतात विवाहित स्त्रिया ती वैशाख संपवणाऱ्या अमावास्येला पाळतात, तर महाराष्ट्रात आणि गुजरातेत त्यानंतरच्या पौर्णिमेला — कथा एक, गणना दोन.
कसा साजरा होतो
स्त्रिया उपवास करून वडाला प्रदक्षिणा घालत त्यावर सूत गुंडाळतात आणि सावित्रीने मृत्यूशी केलेला संवाद पुन्हा सांगतात.